Posts

तुळस

Image
मंडळी, भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक हिंदुच्या दारापुढे तुळशीवृंदावन असतेच. भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीला पूजनीय वनस्पतींमध्ये अग्रस्थान आहे. ही वनस्पती फक्त भारतीय उपखंडातच आढळते. सध्या मनपा निवडणुका जवळ आल्यामुळे गल्लोगल्लीच्या नेत्यांच्या पुढाकारामुळे तुळशीची लग्ने धूमधडाक्यात पार पडत आहेत. असो.  साध्या सर्दी खोकल्यापासून तर अनेक आजारांवर तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या एका एका गुणावर Ph.D. च्या डिग्र्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या आहेत.  तुळशीच्या प्रकारांपैकी पांढरी (राम) व काळी (कृष्ण) तुळस हे दोन मुख्य प्रकार. कृष्ण तुळस ही गुणांनी सर्वात श्रेष्ठ आहे.  तुळशीचा चहा दूध व चहा न टाकता घेतल्यास सर्दी, खोकला, ताप यावर उपयुक्त आहे. तुळशीचा काढा करून घेतल्यास तो वरील विकारांबरोबरच घसा दुखणे, अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे यावर उपयुक्त आहे. एक भाग तुळस म्हणजे पाने, सोळा भाग पाणी एकत्र करून एक अष्टमांश राहीपर्यंत आटवावे. नंतर गाळून तो काढा प्यावा. ही काढा करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.  दम्यावर तुळशीचा खूप उपयोग आहे.  तुळशीचा रस काढून तो मधातून चाटव

हिवाळ्यातील आरोग्य

                हेमंत आणि शिशिर ऋतु मिळून हिवाळा हा ऋतु तयार होतो. या ऋतूत सूर्य दक्षिण ध्रुवाकडे सरकतो. म्हणजेच दक्षिणायन होते. दिवस लहान तर रात्र मोठी असते. आयुर्वेदानुसार हा काळ ’विसर्गकाळ’ असतो. म्हणजे या काळात निसर्गाकडून प्राणिमात्राला बल प्राप्त होत असते. दिवसभर सूर्यप्रकाश असला तरी वातावरणात गारवा असल्याने प्रफुल्लित आणि उत्साही वाटते. सर्व प्रकारची कामे करण्यास उत्साह वाटतो. रात्री मात्र गारठा असल्याने ऊबदार पांघरूणात पडून रहावेसे वाटते. आयुर्वेदानुसार हिवाळा हा बलदायक, आरोग्यकारक काळ सांगितलेला आहे. शिशिर ऋतूत वातावरणात रुक्षता जास्त वाढते. झाडांची पाने गळतात. शिशिर ऋतूत ’पानगळ’ सुरु होते. त्यामुळे सर्व वृक्ष, लता, वेली, झुडुपे, एकूणच सर्व सृष्टी ओकीबोकी आणि निस्तेज दिसू लागते.  हिवाळ्यात शरीराची बाहेरची ऊष्णता कमी होते. त्यामुळे जाठराग्नी चांगलाच प्रदीप्त होतो. म्हणून हिवाळ्यात भरपूर भूक लागते. म्हणून या ऋतूत दोन्ही वेळा भरपूर प्रमाणात आहार घ्यावा. गोड, आंबट पदार्थांचे आहारात जास्त प्रमाण ठेवावे. अर्थात स्वत:ची प्रकृतीचा आणि आजारांचा विचार करावा. तसेच विशिष्ट रोगांमध्ये

अभ्यंग स्नान - त्वचा सौन्दर्यासाठी

             आपल्या शरीरातील अवयवांचे त्वचा रक्षण करीत असते. त्वचा हे शरीराचे बाह्य आवरण आहे. तसेच शरीराचा मुख्य प्रदर्शनीय भाग आहे. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य निगा राखल्यास व्यक्तीमत्त्वाची उत्तम छाप पडते. त्वचेचे पुष्कळ विकार हे हृदयरोग, बेशुद्धी यासारखे गंभीर नसतात. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा विकारांकडे दुर्लक्ष्य केले जाते. परंतु एकूणच आरोग्याच्या दृष्टीने त्वचाविकारांवर योग्य  उपचार घेणे, त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी  त्वचेचे रक्षण व्हावे , त्वचेचे निगा योग्य प्रकारे  राखली  जावी यासाठी आयुर्वेदात  अभ्यंग  स्नानाचे   महत्त्व सांगितलेले आहे.              हिवाळ्यात वातावरणातील रूक्षतेमुळे  त्वचा रूक्ष  व फुटीर होते. त्यामुळे ह्या ऋतूत त्वचा विकार होण्याचा जास्त संभव असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून असणारे, सुप्तावस्थेत असणारे त्वचाविकार बळावण्याचा संभव हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे अभ्यंग स्नान, पथ्यापथ्य पाळणे, आयुर्वेदिक औषधे घेणे  यासारख्या उपायांनी त्वचेची काळजी  घेणे हितावह ठरते. आपण फक्त दिवाळी सारख्या मंगल प्रसंगीच अभ्यंग स्नान करीत  असतो. परंतु केवळ दिवाळीतच नाह