Posts

अगस्ती दर्शन

  मंडळी, पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये असलेले काही उल्लेख आपल्याला कळत नाही. उगीच काही तरी दिले असेल म्हणून आपण दुर्लक्ष करतो. जाणकार व्यक्तीने समजावून सांगितले तर ठीक, नाहीतर आपण लक्ष देत नाही. आता हेच पहा ना ! ९ ऑगस्ट रोजी अगस्ती दर्शन असा उल्लेख पंचांगात आणि कॅलेंडरमध्ये आहे. म्हणजे काय, तर आकाशात अगस्ती ता-याचा उदय या दिवशी झाला. अगस्ती तारा हा दक्षिण दिशेला असतो. उत्तरेला जसा ध्रुव तारा तसा दक्षिणेला अगस्ती तारा. वर्षा ऋतूच्या प्रारंभी हा तारा अस्तंगत होतो, दिसत नाही. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उदित होतो. दर वर्षी अगस्ती उदय किंवा दर्शन असा पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये उल्लेख असतो. अर्थात ही कालगणना प्राचीन कालापासून चालत आली आहे. सध्या ऋतूमान बदलल्यामुळे अगस्ती उदय झाला म्हणजे शरद ऋतु सुरु झाला असे मात्र नाही. असो. पण याचा आरोग्याशी, आयुर्वेदाशी काय संबंध ? अगस्ती ता-याच्या उदयाने पाणी शुद्ध होते असा आयुर्वेदात उल्लेख आहे. अगस्ती ता-याच्या किरणांनी पाण्यातील सर्व विषे, दूषित पदार्थ नष्ट होतात, पाणी शुद्ध होते. असे पाणी सर्वांनी पिण्यास योग्य आहे. इतकेच नव्हे तर अगस्तीच्या उदयाने सर्व व

Hand Foot Mouth आजार अर्थात टोमॅटो फ्ल्यु

  मंडळी , सध्या लहान मुलांमध्ये अंगावर विशेषतः हात आणि पाय यावर लाल पुळ्या येणे , त्यातून पाणी येणे , खाज येणे अशी लक्षणे असलेला आजार साथीच्या स्वरूपात पसरलेला आढळतो आहे. सध्या ' मंकी पॉक्स ' या आजाराचा बोलबाला असल्याने अनेक पालक घाबरून जाताहेत. पण पालकांनो , काळजी करू नका. या आजाराचा आणि मंकी पॉक्स या आजाराचा सबंध नाही. मंकी पॉक्स हा आजार भारतात पसरलेला नाही. सध्या लहान मुलांमध्ये दिसणारा हा आजार 'HAND, FOOT, MOUTH (HFMD)' या आजाराशी साधर्म्य दाखविणारा आजार आहे. खूप पाउस , कोंदट वातावरण , त्यानंतर लगेच कडक उन यामुळे असे आजार पसरतात. आयुर्वेदात वर्णन केलेले शीतला , रोमान्तिका आजारांच्या जातकुळीतील हाही आजार आहे. हा लहान मुलांमध्ये संपर्काने पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. यामुळे अंगावर लाल पुळ्या , त्यातून पाणी येणे , खाज येणे , अंग दुखणे , ताप येणे , काहींमध्ये भूक कमी होणे , घसा दुखणे , सर्दी , डोळे लाल होणे अशीही लक्षणे आढळतात. हा SELF LIMITING आजार आहे. हा १० ते १२ दिवसात बरा होतो. त्यामुळे घाबरू नका. सर्वप्रथम प्रतिबंधात्मक उपचार करावेत. आजार झालेल्या मुलांना ८

पावसाळा, तब्येत सांभाळा !!

  वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. तृषार्त धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. असे ढगाळ वातावरण, सारखा पाऊस पडणे, दमट, कोंदट, रोगट हवा, विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये, अभ्यास करु नये, वेदपठण करु नये, असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ, निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे. आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे विविध विकार पावसाळ्यात होतात. वातप्रकोपावर ’बस्ती’ हा पंचकर्मांपैकी एक महत्वाचा उपक्रम आयुर्वेदात सांगितलेला आहे. विविध औषधांनी युक्त काढ्यांचा किंवा तेलाचा एनिमा विधिपूर्वक घेणे असे सोप्या भाषेत सांगता येईल. या बस्तीने अनेक संभाव्य रोग