Posts

Showing posts with the label धनुर्मास

धनुर्मास

  धनुर्मास © लेखक- डॉ. गोपाल मेघश्याम सावकार, चेतनानगर, इंदिरानगर Annex, नाशिक फोन नं.- 8149988904, इमेल- gsawkar@gmail.com   उत्तरायणातील शिशिर ऋतूत धनुर्मास येतो. सूर्याच्या धनुराशीतील वास्तव्याच्या महिन्याला धनुर्मास म्हणतात. धनुर्मासालाच धुंधुरमास , झुंझुरमास अथवा शून्यमास किंवा धन्धुर्मास असेही म्हणतात. हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्म मुहूर्त म्हणजेच देवतांची पहाट असते , असे म्हटले जाते. पंचांगातसुद्धा धनुर्मास सुरु कधी होतो आणि संपतो कधी हे दिलेले असते. त्या काळात पहाटेच्या वेळी नैविद्य दाखवून पहाटे किंवा सकाळी लवकर जेवण घेण्याची प्रथा आहे. मुगाची खिचडी , कढी , बाजरीची भाकरी , लोणी , वांग्याचे भरीत , तूप असा चविष्ट बेत या दिवसात करतात. सकाळी सकाळी भरपेट जेवण व्हावे असा हेतू त्यामागे आहे.   दक्षिण भारतात धनुर्मासाचे खूप महत्त्व आहे. त्या काळात विष्णूची पूजा केली जाते. मकरसंक्रांतीच्या आधी भोगी येते. त्यादिवशीही असाच बेत करतात. भोगीची भाजीही प्रसिद्ध आहे. हरबरा, वांगे, कांदे, वाल, मेथी, वाटाणे, गाजर, खोबरे, तीळ अशी मिक्स व्हेज टाईप भाजी असते. पोपटी किंवा उंधियो याच प्

धनुर्मास

      धनुर्मासालाच धुंधुरमास किंवा धन्धुर्मास असेही म्हणतात. हिवाळ्यामध्ये वातावरणातील शीतलतेमुळे देहोष्मा  शरीरांतर्गत जातो आणि त्यामुळे जाठराग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे भूक जास्त लागते. अशा वेळी त्या जाठराग्नीला अनुरूप असा आहार घेतला नाही तर तो शरीरातील धातूंचे पचन करून दुर्बलता आणतो. त्यामुळे बल, पुष्टीदायक असा आहार घेणे आवश्यक आहे.          यासाठीच या काळात धनुर्मास पाळायची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची प्रथा आहे. त्यावेळी उठल्यानंतर आन्हिके उरकल्यावर नैविद्य दाखवून भरपेट भोजनच करावे अशी धनुर्मासाची प्रथा आहे. आहे की नाही खवैय्यान्साठी पर्वणी !        भोजनासाठी पदार्थ तरी कोणते ? गरम  गरम  खिचडी, त्यावर तूप,  तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, त्यावर लोणी, भरीत, वांग्याची भाजी, कढी, चटणी.         काय मंडळी सुटले की नाही तोंडाला पाणी ?          अशा रीतीने जाठराग्नीचे शमन झाल्यावर मग पुढील दैनंदिन व्यवहाराला लागायचे, अशी प्रथा होती.        अर्थात हा धनुर्मास फक्त हिवाळ्यात पाळायचा असतो. पंचांगातसुद्धा धनुर्मास सुरु कधी होतो आणि संपतो कधी हे दिलेले असते. सू