Posts

वसंत ऋतूतील प्रकृतीची काळजी

           मंडळी, खास आग्रहास्तव ही पोस्ट पुन्हा देत आहोत.            वसंत ऋतु म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते. सूर्याचे उत्तरायण हळूहळू या ऋतूत सुरु होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढते. शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते. वातावरणात थोडीशी उष्णता वाढताच झाडांना, वेलींना नविन पालवी फुटते. नव्या पालवीमुळे सर्व सृष्टी हिरवीगार, प्रफुल्लित, नवचैतन्याने नटलेली भासते. आंब्याला मोहोर येतो. सर्वत्र सुगंधित फुले फुलतात. कोकीळा कुहु कुहु कुंजन करु लागते. अशा प्रकारे सर्व सृष्टीला नवसंजीवन देणारा हा वसंत ऋतु म्हणजे ’ऋतुराज वसंत’ सुरु होतो.              वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे हिवाळ्यात निसर्गत: आणि आहार-विहारामुळे संचित झालेला कफदोष द्रवीभूत होतो, त्याचे विलयन होते. त्यामुळे या ऋतूत कफदोषाचे अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: श्वसनमार्गाचे व्याधी जास्त होतात. उदा. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखेही व्याधी होतात. या ऋतूत भुकेचे प्रमाण कमी होते. म्हणून पचायला हलके पदार्थ आहारात असावेत. तसेच नविन तयार झालेले धान्य लगेचच खाऊ नय

बाभूळ

                  ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अशी म्हण प्रसिद्ध आहे. बोरी बाभळी ह्या रानोमाळ उगवणारया काटेरी वनस्पती आहेत. बाभळीचा पाला हा शेळ्या- मेंढ्यांचे आवडते खाद्य आहे.                  बाभूळ ही तुरट रसाची आहे. कडू, तुरट रसाच्या द्रव्यांनी दात घासल्याने दातांचे आरोग्य चांगले रहाते. बाभळीच्या कोवळ्या काड्यांनी दात घासावेत. दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले रहाते. दातांच्या आणि हिरड्यांच्या विकारांवर बाभळीच्या काड्या, साल याच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. गुळण्या कराव्यात म्हणजे तोंडात काढा घेऊन फक्त खळखळ गुळण्या असे नव्हे तर, गुळण्या करण्यापूर्वी तो काढा तोंडात १० ते २० सेकंद धरून ठेवावा. त्यामुळे जास्त चांगला परिणाम मिळतो. तोंड येणे, तोंडात जखम, हिरड्यांचे, दातांचे विकार यावर खूप चांगला उपयोग होतो.                      डिं काचे लाडू सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या लाडूंमध्ये जो डिंक वापरतात तो बाभळीचा डिंक असतो. तांबडा-पांढरा अशा रंगाचा तो डिंक असतो. हा मधुर रसाचा, थंड आहे. हा शक्तिवर्धक, विशेषतः शुक्राचे प्रमाण वाढविणारा आहे. शुक्रधातूचे प्रमाण कमी असणे, दौर्बल्य, स्पर्म क

अक्कलकारा

                या वनस्पतीच्या नावातच तिचे गुणधर्म सामावलेले आहेत. मुलांना लहानपणी वडीलधारी माणसे अक्कलकारा तूप-भातात मिसळून खायला देत असत. मुलांनी लवकर बोलावे, स्पष्ट बोलावे यासाठी ते देत.  लहान मुले बोलायला शिकताना सुरुवातीला बोबडे बोलतात. पहिल्या-पहिल्यांदा या बोबड्या बोलांचे कौतुक होते. मात्र काही काही वेळा मुलाचे वय वाढत जाते, पण त्याची बोबडे बोलायची सवय काही जात  नाही. अशावेळी मुलांचे शब्दोच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून त्यांना अक्कलकारा खायला देतात. अक्कलकारा हा जिभेला चुरचुरणारा, किंचित तिखट असल्याने लहान मुले लवकर खात नाहीत. अशा वेळी युक्ती प्रयुक्तीने भातात मिसळून तूप मीठ टाकून अक्कलकारा नियमित खायला द्यावा. याच्या सेवनाने आवाज चांगला, शब्दोच्चार स्पष्ट, बुद्धी तल्लख होते.                   विविध मानसिक आजारांवर अक्कलका-याचा खूप चांगला उपयोग होतो. उन्माद, अपस्मार यासारख्या मानसिक आजारांवर याचा चांगला उपयोग होतो.                    ज्याला उत्तम वक्ता व्हायचे आहे त्याने अक्कलकारा नियमित खावा. शिक्षकी पेशा, निवेदक, समालोचक, सतत बोलण्याचा पेशा असणारे यांनी अक्कलकारा सेवन करावा