Posts

अगस्ती उदय

मंडळी, पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये असलेले काही उल्लेख आपल्याला कळत नाही. उगीच काही तरी दिले असेल म्हणून आपण दुर्लक्ष करतो. जाणकार व्यक्तीने समजावून सांगितले तर ठीक, नाहीतर आपण लक्ष देत नाही. आता हेच पहा ना ! ९ ऑगस्ट रोजी अगस्ती दर्शन असा उल्लेख पंचांगात आणि कॅलेंडरमध्ये आहे. म्हणजे काय, तर आकाशात अगस्ती ता-याचा उदय या दिवशी झाला. अगस्ती तारा हा दक्षिण दिशेला असतो. उत्तरेला जसा ध्रुव तारा तसा दक्षिणेला अगस्ती तारा. वर्षा ऋतूच्या प्रारंभी हा तारा अस्तंगत होतो, दिसत नाही. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उदित होतो. दर वर्षी अगस्ती उदय किंवा दर्शन असा पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये उल्लेख असतो. अर्थात ही कालगणना प्राचीन कालापासून चालत आली आहे. सध्या ऋतूमान बदलल्यामुळे अगस्ती उदय झाला म्हणजे शरद ऋतु सुरु झाला असे मात्र नाही. असो. पण याचा आरोग्याशी, आयुर्वेदाशी काय संबंध ? अगस्ती ता-याच्या उदयाने पाणी शुद्ध होते असा आयुर्वेदात उल्लेख आहे. अगस्ती ता-याच्या किरणांनी पाण्यातील सर्व विषे, दूषित पदार्थ नष्ट होतात, पाणी शुद्ध होते. असे पाणी सर्वांनी पिण्यास योग्य आहे. इतकेच नव्हे तर अगस्तीच्या उदयाने सर्व व

आभार

मंडळी,  पृष्ठदृष्यांची संख्या ५०,००० च्या वर पोहोचली आहे. आपण केलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.  स्वातंत्र्यदिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.

पावसाळा, तब्येत सांभाळा !

     पावसाने जशी अनेक दिवस दडी मारली तशी डॉक्टरांनी पण दडी मारली की काय असे सगळ्यांना वाटत असेल. पण मंडळी, विरहानेच वाचकांचे माझ्यावरचे प्रेम आणि उत्सुकता वाढते, खरे ना ?      वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. तृषार्त धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. असे ढगाळ वातावरण, सारखा पाऊस पडणे, दमट, कोंदट, रोगट हवा, विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये, अभ्यास करु नये, वेदपठण करु नये, असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ, निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे. आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे विविध विकार पावसाळ्यात होतात. वातप्रक