Posts

नारळ

       आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारळास फार महत्त्वाचे स्थान आहे . कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळाने होते . . ओल्या   नारळाला   शहाळे असे म्हणतात .  शहाळ्यातून निघणाऱ्या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात . नारळाशिवाय पूजेची सुरुवात होत नाही . सुवासिनीची कोठेही जाताना आनंद प्रसंगी किंवा मंगल प्रसंगी नारळाने ओटी भरणे शुभ मानले जाते . नारळाचे संपूर्ण झाड उपयुक्त आहे . नारळाला कल्पवृक्ष मानले आहे . प्रेमाने (?) रवानगी करायची असेल तरी नारळ दिला जातो . नारळाची भेट , नारळाचा प्रसाद हे प्रेमाचे द्योतक आहे . नारळाचे खोबरे , तेल , नारळाचे दूध , नारळातील पाणी याचे खूप उपयोग आहेत . नारळाच्या करवंटीचाही उपयोग होतो . पानांपासून खराटा , झाडू करतात . माड   किंवा   श्रीफळ   हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे   समुद्रकिनारे   आणि लगतच्या भागात वाढणारा ,  ताड   कुळातील एक वॄक्ष आहे . याचे   फळ   नारळ या नावाने ओळखले जाते . सुमारे ३० मीटर उंचीच्या या वृक्षाला ४ - ६ मीटर लांबीची झाव