Posts

Showing posts from 2019

अभ्यंग स्नान - त्वचा सौन्दर्यासाठी

Image
आपल्या शरीरातील अवयवांचे त्वचा रक्षण करीत असते. त्वचा हे शरीराचे बाह्य आवरण आहे. तसेच शरीराचा मुख्य प्रदर्शनीय भाग आहे. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य निगा राखल्यास व्यक्तीमत्त्वाची उत्तम छाप पडते. त्वचेचे पुष्कळ विकार हे हृदयरोग, बेशुद्धी यासारखे गंभीर नसतात. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा विकारांकडे  दुर्लक्ष्य केले जाते. परंतु एकूणच आरोग्याच्या दृष्टीने त्वचाविकारांवर योग्य  उपचार घेणे, त्वचेची काळजी घेणे  महत्त्वाचे आहे. निरोगी  त्वचेचे रक्षण  व्हावे , त्वचेचे निगा योग्य प्रकारे  राखली  जावी यासाठी आयुर्वेदात  अभ्यंग  स्नानाचे   महत्त्व सांगितलेले आहे.               हिवाळ्यात वातावरणातील रूक्षतेमुळे  त्वचा रूक्ष  व फुटीर होते. त्यामुळे ह्या ऋतूत त्वचा विकार होण्याचा जास्त संभव असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून असणारे, सुप्तावस्थेत असणारे त्वचाविकार बळावण्याचा संभव हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे अभ्यंग स्नान, पथ्यापथ्य पाळणे, आयुर्वेदिक औषधे घेणे  यासारख्या उपायांनी त्वचेची काळजी  घेणे हितावह ठरते. आपण फक्त दिवाळी सारख्या मंगल प्रसंगीच अभ्यंग स्नान करीत  असतो. परंतु केवळ दिवाळीतच नाही तर हिवाळ्या

माका

  शरद ऋतूत नदी, ओढ्याच्या काठी, पाणथळ जागी भरपूर माका उगवलेला दिसतो. पितृपक्षात श्राद्धाच्या पिंडांना वाहण्यासाठी माका वापरतात, एव्हढाच काय तो आपला आणि माक्याचा संबंध.  माक्यालाच भृंगराज असे संस्कृत नाव आहे. माका हा रसायन आणि बुद्धिवर्धक आहे. केसांच्या आजारांवर, वाढीवर अत्यंत उपयुक्त आहे. डोळ्यांना आणि त्वचेला हितकर आहे. माक्याचा रस सिद्ध करून तयार केलेले भृंगराज तेल केसांच्या वाढीसाठी, केसात कोंडा होणे, टक्कल पडणे, केस पांढरे होणे यावर वापरतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी माक्याचे तेल नियमित डोक्याला लावावे. डोके दुखत असल्यास माक्याचा रस नाकात टाकावा किंवा डोळ्यांना चोळावा.                   काविळीवर माक्याच्या रसाचा किंवा चूर्णाचा खूप उपयोग होतो. सूज आली असल्यास माक्याच्या रसात मिरेपूड घालून द्यावी व सूजेलाही लावावी. भाजलेल्या जखमेवर, किंवा कोणत्याही जखमेवर जखम भरून आल्यानंतर माक्याचा रस तेथे नियमित लावावा म्हणजे त्वचेवर डाग पडत नाहीत.                   ज्या भागात चरबी वाढली असेल तेथे माक्याचा रस चोळून लावावा. तोंड आले असल्यास माक्याची पाने चावून थुंकावीत. त्वचेच्या व

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा !!!

आला उन्हाळा , तब्येत सांभाळा !!! नमस्कार मंडळी ! मोठा झालेला दिवस , दिवसभर असणारा उकाडा , सारखा घाम येणे , दिवसभर उत्साह न वाटणे , यामुळे उन्हाळ्याचा आपल्याला कंटाळा येतो. तर विविध शीतपेये , आईस्क्रीम , मुलांची मोठी सुटी , आमरसाच्या मेजवान्या आणि लग्नसराई यामुळे दुसरीकडे उन्हाळा हवाहवासाही वाटतो. पण या काळात आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.   उन्हाळ्यात उन्हात जास्त हिंडू नये. उन्हाच्या वेळी बाहेर जायचे झाल्यास डोक्याला टोपी किंवा रुमाल बांधून जावे. उन्हाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्यामुळे पाणी उकळून प्यावे किंवा फिल्टर करून प्यावे. पिण्याचे पाणी उकळून नंतर वाळा , मोग्र्याची फुले असे सुगंधी पदार्थ टाकून थंड करून प्यावे. प्रकृतीनुसार ज्यांना मानवते त्यांनी थंड पाणी प्यावे. फ्रीजपेक्षा माठात थंड केलेले पाणी अधिक चांगले. आईस्क्रीम , बर्फ , कृत्रिम शीतपेये यांचा वापर शक्यतो टाळावा. त्याऐवजी थंडगार लिंबू सरबत , आमसुलाचे सरबत , कैरीचे पन्हे , शहाळ्याचे पाणी , गोड ताक , ताजी नीरा यासारख्या नैसर्गिक शीतपेयांचा भरपूर वापर वापर करण्यास हरकत नाही